Ad will apear here
Next
पुस्तकांच्या गावाने रचला इतिहास
भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन करताना मान्यवर

सातारा : ‘वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी भिलारमध्ये येऊन कार्यक्रम घडवून आणावेत,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. आजवर स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जाणारे थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव आता पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार असून, भिलारवासीयांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आपली आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे,’ असे ते म्हणाले. 

भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी, चार मे रोजी रोजी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळी-वेगळी सुंदर संकल्पना राबवून ती कार्यान्वित केल्याबद्दल मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे व भिलार गावच्या ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. ‘भिलारने देशात या निमित्ताने वेगळा इतिहास रचला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचनसंस्कृती कमी होते की काय, अशी भीती व्यक्त होत असताना, भिलारवासीयांनी ‘नाही.. आपल्याला वाचनसंस्कृती पूर्वजांनी दिलेली आहे. ती कमी होऊ देणार नाही,’ असा संदेश दिला आहे. आज गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी सजली आहे. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही,’ असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना यापुढे स्ट्रॉबेरीच्या चवीबरोबरच वाचनाची भूक भागवण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात वाचनसंकृती नवीन नाही. मराठी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही असते. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना हा इतिहासही रचलेला आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भिलारबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी, ‘यापुढे साहित्यिक व प्रकाशकांनी या ठिकाणी येऊन प्रकाशन समारंभ घ्यावा. मीसुद्धा त्या कार्यक्रमाला निश्चित येईन,’ असे आश्वासनही दिले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाले. यावेळी ‘पुस्तकाचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखवलेल्या औदार्याची माहिती मिळते. प्रारंभी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. 

या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सरपंच वंदना भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZUUBC
Similar Posts
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर
जावे पुस्तकांच्या गावा... भाषेचे संवर्धन ही खरे तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपायययोजना राबवल्या जात आहेत, ही आनंदाचीच बाब आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्रदिनी महाबळेश्वरजवळच्या भिलार गावात ‘पुस्तकांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ओळख... ...
२२ फेब्रुवारीला कारकीर्द सुरू करणारे दोन नेते पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातले ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. २२ फेब्रुवारी १९६७ या दिवशी पवार हे बारामती मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने विधानसभेवर निवडून गेले होते. विशेष योगायोग म्हणजे राज्याचे सध्याचे
शिवसेना-भाजप खासदार युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर! अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार आज पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. केंद्रीय   या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language